Bhartiya Rajyaghatana
विसाव्या शतकातील महान परिवर्तन म्हणजे भारतीय राज्यघटना.
या महान परिवर्तनाची संपूर्ण कथा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत
घडली आणि उदयाला आली. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांना
काही पाश्चात्य संदर्भ असले तरी राज्यघटनेचा आत्मा मात्र अस्सल
भारतीय. रूढीवादाविरोधातील संघर्षातून राज्यघटनेच्या भारतीय
आत्म्याने (स्पिरिट) भारतीय समाजाला आधुनिक युगाची विश्वदृष्टी
दिली. त्याच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहिली. त्या आव्हानांच्या
विरोधात राज्यघटनेने अनेक सुप्त क्रांत्या (Silent Revolution)
केल्या. समकालीन काळात राज्यघटनेच्या स्पिरिटची रूढीवादी
सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी
घटनात्मक चळवळ सुरू आहे.
या चळवळीचे प्रेरणास्रोत आणि संघर्षकथा हा या पुस्तकाचा
मुख्य विषय आहे. या विषयाचा आशय सरनामा, मूलभूत हक्क,
मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत रचना सिद्धांत हा आहे. यालाच राज्यघटनेचा आत्मा म्हणतात.
- डॉ. प्रकाश पवार राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
Bhartiya Rajyaghatana | Editor: Dr. Prakash Pawar
भारतीय राज्यघटना । संपादक : डॉ. प्रकाश पवार
