Rajyogini Ahilyabai Holkar - Aaple Samaj Sudharak
लोकमाता, शरणांग्ता, न्यायनिष्ठूर, लोक प्रशासक.
अभयदात्री, दानशूर, धर्माभिमानी असूनही
सर्वधर्मभाव सांभाळून आयुष्यभर
निष्ठेने, केवळ परोपकारी वृत्तीने
राज्य कारभार करून, स्वदु:ख बाजूला
ठेऊन केवळ लोकोपरार्थ आयुष्य
जगणार्या महाराणी अहिल्याबाई
होळकर यांचं चरित्र हे
प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी, मुलांनी वाचावं
असं आहे. महाराणी अहिल्याबाई
होळकर हे प्रात:स्मरणीय नाव! निरपेक्षपणे
महाराणी अहिल्याबाई होळकर
यांनी स्वत: व्रस्तस्त भूमिका
स्वेच्छेने स्वीकारत स्वत:च्या
इंदौर संस्थानाचा विकास
केलाच. शिवाय संपूर्ण भारतात
तीर्थक्षेत्रांचा विकास केला. लोकसेवेचा
वारसा त्यांनी आधुनिक भारताला
दिला. हा वारसा वाराणसीपासून
कृष्णेच्या तीरावरच्या वाईपर्यंत
आजही टिकून आहे. आयुष्यात येणारी
दु:ख
बाजूला करत
माणसाने पुढे
कसं जायचं याचं मार्गदर्शन
महाराणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर
यांच्या चरित्रातून प्रत्येक
ओळीतून जाणवतं. मनोविकास प्रकाशनचं
हे पुस्तक म्हणजे त्या लोकमातेला त्रिवार
प्रणाम!